सेलू (प्रतिनिधी):
सेलू शहरातील सातोना रोडवरील मयुरी पार्क परिसरात १२ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या भव्य ‘फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा’ आणि परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून साकार होणाऱ्या महाभारत कथा सोहळ्याच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. या आध्यात्मिक सोहळ्याच्या नियोजन व समन्वयासाठी उभारण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
सातोना रोडवरील वैष्णवी ट्रेडर्स कॉम्प्लेक्स येथे सुरू करण्यात आलेल्या या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे आणि साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडकळर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उद्योजक जयप्रकाश बिहाणी, महेश खारकर, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, दत्तराव मगर, चंद्रशेखर मुळावेकर, जयराम महाराज तांगडे, कृष्णा महाराज रासवे, दत्तराव पावडे, अविनाश बिहाणी, महादेव ढवळे, माऊली चव्हाण, संजय पिंपळगावकर, रामप्रसाद चव्हाण, मारोती वाघ, श्रीपाद मसलेकर, बाबासाहेब हेलसकर, एकनाथ कटारे, योगेश सोळंके, अच्युत्तराव आंधळे, सुदाम जाधव, किसन खेडेकर, नामदेव आवटे, देवराव आबुज, ओमकार टेकाळे, मोहन हातकडके, सुनील गायकवाड, चंद्रकांत कुलकर्णी, रामेश्वर लाटे, विलास पाटील, शंकर लाटे, दत्तराव झोल, विठ्ठलराव झोल, नबाजी खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर, ज्ञानेश्वरी प्रचारक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आठवडाभर चालणाऱ्या या आध्यात्मिक पर्वाच्या यशस्वी आयोजनासाठी हे संपर्क कार्यालय कार्यरत राहणार असून, अधिक माहितीसाठी भाविकांनी येथे संपर्क साधावा, असे आवाहन समस्त ज्ञानेश्वरी प्रचारक व उपासकांच्या वतीने करण्यात आले आहे.
छायाचित्र:
सेलू शहरात आयोजित ‘फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्या’च्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते केले.

✍🏻मुख्य संपादक – अशोक अंभोरे
























