स्वच्छतेच्या कारणाहून तडखाफडकी बदलीची गावभर चर्चा
◾कार्यकाळात अनेक वादग्रस्त गून्ह्यांच्या नोंदी?
◾ खून प्रकरण, पोलिसांवरील हल्ले वाढती गुन्हेगारी अंगलट आली?
सेलू / प्रतिनिधी
सेलू:शहराचे पोलीस निरिक्षक म्हणून ८ मार्च २०२४ रोजी पदभार स्विकारल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात कायदा व सूव्यवस्था प्रस्थापीत करण्यासाठी प्रयत्न करण्याची धडपड मात्र कार्यकाळात शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चो-या,जिवघेणे हल्ले, पोक्सो, खूनासारखे अनेक गून्हे दाखल झाले.दरम्यान ब-याच गून्ह्यातील आरोपींचा शोध लागत नाही, आरोपीना जेरबंद करण्यात काही अंशी तात्कालीन पोलीस निरिक्षक दिपक बोरसे यांना यश आले,परंतु सेलू व तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी होत नाही.
नवनियूक्त पोलीस अधिक्षक पंकज कूमावत यांनी सेलू पोलीस स्टेशन येथे भेट दिली असता त्यांना या ठिकाणी अस्वच्छता आढळून आली आणि तात्काळ तोंडी आदेश देत पोलीस निरिक्षक दिपक बोरसे यांना कंट्रोल रूम येथे रूजू होण्याची सूचना देण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत बोरसे यांनी कंट्रोल रूम येथे आपला पदभार स्विकारला, मात्र सेलू पोलीस स्टेशन येथे कार्यरत असतांना त्यांनी अनेकांवर फिर्यादी कोणी नसतांना पोलीस कर्मचा-यांना फिर्यादी करून अनेक गून्हे दाखल केले.दरम्यान तालूक्यातील अवैध वाळू उपसा,अवैध दारू विक्री,अवैध गूटखा,आएपिएल सट्टा, मटका,जुगार, असे अवैध धंदे राजरोसपणे चालू होते. अनेकांनी तक्रार दिल्या पण वाळू चोरी, अवैध धंदे बंद झाले नाहीत.या धंद्यावर जबर बसविण्यात अपयशी ठरले.अवैध धंद्यातील मूख्य मालक सोडून इतर लहान मोठ्या धंदेचालकावर कारवाहीचा बडगा उगारण्यात आला.मात्र तालूक्यातील अवैध वाळू उपसा,अवैध गूटखा विक्री, मटका,जुगार बंद झाला नाही, तर जोमाने सूरू होते.असे असतांना तात्कालीन पोलीस निरिक्षक बोरसे यांनी सदरिल अवैध धंदे वाल्याकडे जाणीपूर्वक दूर्लक्ष केले असल्याची चर्चा नागरीक करत आहेत.पोलीस स्टेशन मधील कार्यरत सर्व कर्मचा-यांना आदेश देण्यात आला होता की,मला विचारल्याशिवाय कूठल्याही घटनांची माहीती प्रसार माध्यमापर्यंत पोहचता काम नये.यामूळे अनेक गून्ह्याची माहिती प्रसार माध्यमापर्यंत पोहचू दिली नाही.तात्कालीन पोलीस निरिक्षक दिपक बोरसे यांनी आपल्या कार्यकाळात पोलीस स्टेशनची इमारत बांधकाम सूरू असतांना नूतन महाविद्यालयाच्या वस्तीगृहातून पोलीस स्टेशनचा कारभार चालवला खरा मात्र नविन इमारतीत पोलीस स्टेशन स्थलांतरीत होवून त्यांनी नविन प्रशस्थ इमारतीतून तालूक्याचा कायदा व सूव्यवस्थेचा कारभार सांभाळला.केवळ स्वच्छता ठेवता आली नाही म्हणून तात्काळ बदली असा प्रवास करावा लागला असला तरी तालूक्यात मात्र या बदलीची वेगळीच चर्चा सूरू आहे.तसेच चार पोलीस कर्मचा-यांवर झालेले हल्ले, जर पोलीस सूरक्षीत नसतील तर सर्वसामान्यांचे काय हा प्रश्न नागरीकांना पडला आहे.
◾गोवंश व खून प्रकरण हाताळण्यात अपयश?
गायत्री नगर येथे आदित्य प्रधान याच्या खूनी हल्ला १६ एप्रिल रोजी करण्यात आला व उपचारादरम्यान १७ एप्रिल रोजी आदित्यचा मृत्यू झाला.आदित्यच्या कूटूंबासह नागरीकांनी आदित्य प्रधानचा मृतदेह १८ एप्रिल रोजी पोलीस स्टेशनमध्ये आणून मूख्य आरोपी च्या अटकेची मागणी केली.
मात्र खुन प्रकरणातील आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असताना पोलिसांनी त्यांच्यावर आधीच तडीपारीची कारवाई केली असती तर हा गुन्हा घडला नसता, तसेच मूख्य आरोपी अद्यापही फरार आहे. उलट आरोपींना अटक कधी करणार असे विचारणा-या नागरीकांवर गून्हे दाखल केले गेले.खून प्रकरण बाजूला राहिले मात्र मारहाणीत जखमी झालेल्या आनंद ढोले यांच्या कूटूंबातील व इतर व्यक्तीवर पोलीस फिर्यादी होऊन गून्हे दाखल करण्यात आले.गायत्री नगर येथील नागरीकांनी सांगीतले की खून पोलीसांच्या समोर करण्यात आला तरी सूद्धा पोलीसांनी काही हस्तक्षेप केला नाही नसता भांडणे खूनापर्यंत पोहचली नसती व एक निष्पाप जिव वाचला असता.तसेच तालूक्यातील विनापरवाना अवैध धंद्यांना मूकसंमती जर तक्रार कोणी दिली तर त्याला धमकावणे असा प्रकारमूळे कोणीही तक्रार देण्यास पूढे येत नव्हते.शहरासह ग्रामिण भागात अवैध देशी विदेशी दारूचा महापूर,अवैध वाळू उपसा आयपिएल सट्टा, जुगार, मटका,गूटखा बंदी असतांना जोमात विक्री असे अनेक धंदे राजरोसपणे सूरू होते.निश्चितच त्यांना वरदहस्त कोणाचा याची माहिती सांगण्याची गरज नागरीकांना नाही.दरम्यान खून प्रकरण हाताळण्यात आलेले अपयश हे बदलीचे मूख्य कारण असल्याची चर्चा नागरीकातून होत आहे.तसेच गोवंश मांस विक्रीवर कारवाही हे सूद्धा प्रकरण अंगलट आल्याची चर्चा आहे.

✍🏻मुख्य संपादक – अशोक अंभोरे
























